गोड आठवणी आपलंस करतात, कटू जगाला क्षणार्धात नाहीस करतात
तर कटू आठवणी जगायला शिकवतात, पुढचा पाऊल टाकताना विचार करायला शिकवतात
कधी मायेची उब तर कधी मैत्रीचा ओलावा
आठवणीच असतात एकटेपणातील सहारा
कधी हसता हसता रडवतात तर कधी रडतानाही हसवतात
शांततेत बोलतात,
गोंधळातील क्षण शांततेने टिपतात,
आपल्यानंतरही ज्या मुकं रूपाने उरतात
आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा चिरंतन करून जातात
त्या फक्त आणि फक्त आठवणीचं असतात